!! श्री स्वामी समर्थ !!
इतिहासातील सुवर्णपान म्हणजे साळुंखे घराण्याचा इतिहास
सरदार सरनोबत साळुंखे घराण्याचा इतिहास व वंशावळ
सहाशे वर्षाचा राजवंश-राजे साळुंखे-चोर घराणा आणि त्यांचा पराक्रमी इतिहास :
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र म्हटले, की श्रीमंत सरदार तुकोजी चोर साळुंखे,सरदार भिकाजी चोर आणि सरदार भैरव चोर या साळुंखे कुळातील पडनावाने राहाणाऱ्या तीन सरदार चोर बंधूंची आठवण कोणाला सुद्धा झाल्याशिवाय राहाणार नाही. या तिन्ही सरदार चोर बंधूंनी स्वराज्यासाठी आपले चांगलेच योगदान दिले होते. स्वराज्याच्या लढलेल्या पहिल्या लढाईत वरील तिन्ही चोर सरदार बंधूंनी मोठाच भीम पराक्रम केल्याचा इतिहास आहे. ज्या लढाईने फत्तेखानाचा पूर्णपणे धुव्वा उडविला होता.
महाराष्ट्रातील मराठयांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा असलेल्या घराण्यांचा अभ्यास करतांना अग्रक्रमाणे वरच्या क्रमांकावर विचार करायला लावणारे घराणे म्हणून राजे चोर या साळुंखे कुळातील पडनावाने राहाणाऱ्या घराण्याचे नांव खूप वरच्या स्थानावर येते. वेंगीच्या चाळुक्य उर्फ साळुंखे राज घराण्याचा सहाशे वर्षाचा वारसा लाभलेल्या या घराण्यातल्या चोर वंशजांनी, नंतरच्या काळात देखील आपले मनगटी शौर्य कमी होऊ दिले नाही हे विशेष आहे. अशा या पराक्रमी चोर घराण्यातील सरदारांनी शिवाजी राजांच्या सैन्याचे काही काळ सरनौबत पद देखील भूषविले होते.
चोर हा घराणा इतिहासाचे वलय लाभलेला मराठयांच्या इतिहासातील कायम चर्चेत राहिलेला एक पराक्रमी घराणा आहे. वरवर पाहाणाऱ्याला हा पराक्रमी सरदार घराणा वाटत असेलही, पण तो इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेल्या दक्षिणेतील चोळ-चाळुक्य राजवंशाचा वंशज घराणा आहे. सांगायचेच झाले तर चोर हे आडनाव दक्षिणी भारतातील एक प्रसिध्द राजवंश असलेल्या चोळ या आडनावाचा 'संस्कृत' शब्दातला अपभ्रंश आहे. याचाच अर्थ म्हणजे महाराष्ट्रातील आजचे जेवढे चोर वंशज असतील ते चोळ राजवंशाचे वारसदार आहेत.
चोर आडनावाच्या बाबतीत अजून दुसरी एक आश्चर्याची बाब सांगायची झाली तर महाराष्ट्रातील मराठ्यात असलेले आजचे चोर वंशज हे चोळ राजवंशाचे वारसदार वाटत असले, तरी ते वेंगीच्या चाळुक्य राजवंशातून चोळ राजवंशात दत्तक गेलेले आहेत. त्यामुळे चोर हे आडनाव चोळ आडनावाचा अपभ्रंश असले, तरी ते चाळुक्य उर्फ साळुंखे राजकुळाच्या भावकीतील एक प्रतिष्ठित उप आडनाव आहे.
इतिहासाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या चोर घराण्यातील बहुतांश लोकांनी अलीकडच्या काळात चोर हे आडनाव बदलून ते साळुंखे असे परिधान केलेले आढळते. पूर्वी हे आडनाव अनेकदा ऐकण्यात आलेले होते, या आडनावातील सरदार लोकांचे पराक्रम ही वाचण्यातून गेले होते
मात्र यासाठी इतिहास चिकित्सक आणि पी.एच.डी. गाईड डॉ. नीरज साळुंखे यांनी दिलेली चोर या नावाबद्दलची एक छोटीशी चिकित्सक
डॉ. नीरज साळुंखे यांच्या मते चोर या आडनावाच्या उत्त्पत्तीसाठी चोळ या राजवंशाचे आडनाव कारणीभूत असले पाहिजे. कारण चोळ या आडनावाच्या अपभ्रंशातूनच चोर या आडनावाची उत्पत्ती होणे शक्य आहे. त्यांच्या मतानुसार मराठीत 'ळ' आणि 'र' ही वर्णाक्षरे उच्चारासाठी सारखीच आहेत. यावरून दक्षिणेतील चोळ हेच महाराष्ट्रातील चोर या आडनावाचे उत्पत्तीस्थान आहे. नीरज सरांच्या वरील सिद्धांतानुसार चोळ राजवंशाला अभ्यासूनच चोर या आडनावाचे निर्माण धागे शोधावे लागणार होते.
दक्षिणेतील चोळ राजांचे वंशज हेच महाराष्ट्रातील चोर आहेत, हे पटण्यासारखे नव्हते! कारण चोर हे आडनाव महाराष्ट्रातील पराक्रमी मराठा घराणे असलेल्या साळुंखे या राजवंशाच्या आडनावाचे भावकीतील एक उप आडनाव होते, तर साळुंखे या आडनावाचे मूळ उत्पत्तीस्थान चाळुक्य हा राजवंश आहे. त्यामुळे चाळुक्य आणि चोळ या दोन्ही इतिहासातील भिन्न राजवटी (घराणे) असतील, तर चोळांचे वंशज असलेले चोर हे चाळुक्यांचे वंशज असलेल्या साळुंखे या आडनावाच्या भावकीचे आडनाव कसे होऊ शकते? हे देखील तितकेच खरे होते.
काही का असेना पण त्यानिमित्ताने का होईना हा प्रश्न मात्र नव्यानेच ऐरणीवर आला होता. पूर्वी युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक वेळा एखाद्या राजवंशाला वारस राहत नसे, त्यामुळे एका कुळातून दुसऱ्या कुळात दत्तक घेणे देणे हे प्रकार त्या काळात सर्रास घडून येत असत. त्यामुळे या आडनावाचे निर्मितीस्थान दत्तकातीलच तर एक प्रकार नसावा? म्हणून तशा शक्यतेला देखील तपासणे गरजेचे होते. चोर आडनावाच्या बाबतीतील हा प्रकार जर दत्तक प्रकारांतून घडलेला असेल, तर मराठयांतील चोर या आडनावाने राहणारे हे लोक मग चोळ की चाळुक्य ? हा दुसरा एक सवाल देखील त्यानिमित्ताने निर्माण झाला.
चोर आडनाव निर्माण होण्यासाठी दत्तक हे कारण असल्याचे जर मान्य करायचे ठरविले तर मग पुढचा आणखी एक प्रश्न निर्माण होणे क्रमप्राप्त होते आणि तो म्हणजे, 'चोळ चाळुक्यांमध्ये की चाळुक्य चोळांमध्ये' नेमके कोण कोणात दत्तक गेले? त्यानिमित्ताने का होईना हे अभ्यासने ज़रूरी बनले होते. या सर्व गोष्टीला काहीतरी ऐतिहासिक आधार हवा, म्हणून त्यासाठी भारतातील चाळुक्यांच्या बदामी, कल्याणी, वेंगी अशा प्रमुख राजवटींचा अभ्यास करणे आवश्यक होते.
बदामीचे चाळुक्य आणि कल्याणीचे चाळुक्य यांच्यामधून चोळ घराण्यात अथवा या दोन्ही चाळुक्यांमधून चोळ घराण्यात कोणी दत्तक गेल्याचे पुरावे इतिहासात कुठे दिसले नाहीत! त्यामुळे मराठयांमधील चोर आडनावाचा चाळुक्यांच्या बदामी आणि कल्याणी राजवटीशी कसलाही सम्बन्ध नसल्याचे जाणवले. चोरांचे मूळ शोधण्यासाठी आता मात्र वेंगीचे चाळुक्य आणि इतर काही छोट्या चाळुक्य राजवटींचा अभ्यास करणे ज़रूरी होते. हा अभ्यास केल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील चोर आडनावाचेे मूळ वेंगीच्या चाळुक्यांमध्ये दडलेले सापडले.
वेंगीचा अर्थात पूर्वीचा चाळुक्य वंश दक्षिणी भारतातील एक प्रसिद्ध राजवंश होता. ज्याची राजधानी सध्याच्या आंध्रप्रदेशातील वेंगी येथे म्हणजे आजच्या एलुरू जवळ स्थित होती. बदामी सम्राट पुलकेशी चाळुक्य द्वितीय याने जिंकलेल्या कॄष्णा आणि गोदावरी नदीच्या आतल्या पूर्वेकडील प्रदेशावर त्याचा लहान भाऊ कुब्ज विष्णुवर्धन याची नेमणूक केली होती. त्याचा मुलगा जयसिंह प्रथम याने पूर्णपणे स्वतंत्र होत नव्या राज्याची घोषणा केली, तेच हे पूर्वेकडील वेंगी चाळुक्य होत.
पूर्वी चाळुक्यांनी सातव्या शतकाच्या प्रारंभीपासून इ.सन 1070 पर्यंत वेंगी येथे चाळुक्य म्हणून राज्य केले, तर हेच चाळुक्य चोळ राजवटीत दत्तक गेल्यानंतर चोळ-चाळुक्य बनून त्यांनी इ.सन 1070 पासून तेराव्या शतकाच्या अस्तापर्यंत राज्य केले. म्हणजे वेंगी चाळुक्यांनी जवळपास तब्बल सहाशे वर्ष वेंगी आणि चोळ राज्यात राहून आपले धर्मराज्य केल्याचा इतिहास आहे. वेंगीे चाळुक्य हे चोळ साम्राज्यात दत्तक गेल्यानंतर त्यांनी या राज्याच्या अस्तापर्यंत चोळ-चाळुक्य अशा जोड़नावाने वेंगी आणि चोळ या दोन्ही साम्राज्याचे संरक्षन केले.
वेंगी ही पूर्वी चाळुक्यांची अगोदरची राजधानी होती, ती नंतर राजमहेन्द्रवरम अर्थात राजमुन्द्री अशी करण्यात आली. पूर्वी अर्थात वेंगी चाळुक्यांचा बादामी चाळुक्यांसोबत जवळचा सम्बन्ध होता. वेंगीच्या राज्यामुळे चोळ साम्राज्य आणि पश्चिमी चाळुक्यांमध्ये कितीतरी युद्धे झाल्याचा इतिहास आहे. अशाच एका युद्धातून चोळ राजा राजराज याने पूर्वी चाळुक्यांवर आक्रमण करून त्यांचे वेंगी राज्य जिंकून घेतले. मात्र त्यानंतर पश्चिमी चाळुक्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाढल्यामुळे चोळ राजाने थोडे नमते घेतले.
चोळ राजा राजराज यानेे पूर्वी चाळुक्यांचे राज्य जिंकलेले असतानाही, चाळुक्यांच्या सिंहासनावर शेवटी शक्तिवर्मन चाळुक्य यालाच बसविले आणि राजराज चोळ यांनी शक्तिवर्मन चाळुक्य याच्या विमलादित्य नावाच्या लहान भावा बरोबर स्वतःच्या कुंदवा नावाच्या मुलीचा विवाह सुद्धा लावून दिला. त्याच वेळात कलिंगचा गंग राजा हा चाळुक्यांच्या वेंगी राज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याला सुद्धा चोळ नरेश राजराज याने युद्धासाठी आमंत्रित करून पराजित केले.
पूर्वी (वेंगी) चाळुक्य नरेश कुलोत्तुंग चाळुक्य प्रथम (इ.सन 1070-1120) याची आई आणि त्याच्या वडीलांची आई या अनुक्रमे राजेंद्र (पहिला) चोळ अर्थात राजराज प्रथम याची मुलगी होती, तर कुलोत्तुंग चाळुक्य प्रथम हा स्वतः राजेंद्र चोळ (द्वितीय) याच्या मुलीबरोबर विवाहित झालेला होता. कुलोत्तुंग चाळुक्य याने अधिराजेंद्र चोळ यांच्या साथीने त्याच्या सभोवतीच्या होणाऱ्या सगळ्या आक्रमणांना परतवून लावले आणि आपल्या राज्याची परिस्थिती मजबूत बनविली. कुलोत्तुंग याने त्याच्या अंतिम काळापर्यंत संपूर्ण चोळ साम्राज्य आणि दक्षिणी कलिंग प्रदेशांवर सुद्धा आपले अस्तित्व जमवून राज्य केले.
विक्रम चोळ-चाळुक्य (इ.सन 1118-1133) हा कुलोत्तुंग नंतर चोळ-चाळुक्य राज्याचा उत्तराधिकारी म्हणून गादीवर आला. कुलोत्तुंग प्रथम नंतर चोळ-चाळुक्य यांनी जवळपास दोनशे वर्षे राज्य केले. या काळात विक्रम चोळ-चाळुक्य, कुलोत्तुंग द्वितीय (इ.सन 1133-1150), राजराज द्वितीय (इ.सन 1146-1173), राजाधिराज द्वितीय (इ.सन 1163-1179), कुलोत्तुंग तृतीय (इ.सन 1178-1218), राजेंद्र (इ.सन 1216-1246) या चोळ-चाळुक्य राजांनी आपले शासन केले. चोळ-चाळुक्य वंशाचा शेवटचा राजा हा राजेंद्र तृतीय होऊन गेला, त्याने इ.सन 1246-1279 या कालावधीत राज्य केले.
चोळ राजा अधिराजेन्द्र याला मूलबाळ नव्हते, तो निपूत्रिक राजा होता. कारण तो अल्पायुषी राजा होता, कमी वयातच त्याचा मॄत्यू झाला होता. चोळांच्या राज्यामध्ये घडलेल्या या आकस्मिक बदलांमुळे चोळ राज्यात काळजीचे मळभ निर्माण झाले होते. चोळ राज्याला वारस राहिला नसल्याने त्या शेजारील राज्यांकडून आक्रमणाची भीती वाढल्याने चोळ राज्यात भितीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी शेजारील राज्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाढल्याने मयत अधिराजेन्द्र चोळ यांच्या घरातही भितीचे वातावरण निर्माण झालेले होते.
राज्यातील लोकांची ही भीती ओळखून मयत पुत्र अधिराजेन्द्र चोळ यांच्या मॄत्यूपश्चात त्याच्या वयस्क पित्याने राज्यातील लोकांत मसलत केली आणि त्याचा जावाई अर्थात वेंगी राज्याचा सम्राट असलेल्या राजा, राजेन्द्र कुलोत्तुंग चाळुक्य यास चोळांचे राज्य सुपूर्द केले. चोळ राज्यात अचानक झालेल्या या घडामोडीमुळे चोळांचे राज्य चाळुक्यांच्या वेंगी राज्यात सामील झाले. अधिराजेन्द्र चोळ याचे राज्य देखील वेंगीच्या चाळुक्य राज्यात सहभागी झाल्यामुळे वेंगी राज्याच्या सीमा आपोआपच वाढल्या.
तसे पाहता चाळुक्य आणि चोळ या दोन्ही राज वंशामध्ये पूर्वापार पासूनचे सोईरसम्बन्ध असल्याचे लक्षात येते. यातील पिढीजात नाही पण काही तात्कालीन सोईरसम्बंधावर प्रकाश टाकायचाच म्हटल्यावर चोळ राजा राजराज प्रथम याने विमलादित्य चाळुक्य याला आपली मुलगी देवून सम्बन्धी बनवलेले होते. विमलादित्य चाळुक्य याच्या नंतर त्याचा मुलगा विष्णुवर्धन चाळुक्य हा पूर्वी चाळुक्य राज्याचा सम्राट बनला. त्याचा विवाह सुद्धा चोळवंशातील एका राजकुमारी बरोबर झाला होता.
राजा विष्णुवर्धन चाळुक्य याचा मुलगा राजेन्द्र हा वेंगी चाळुक्यातील एक पराक्रमी वीर होता, ज्याला कुलोत्तुंग चाळुक्य या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जात होते. अशा या पराक्रमी वीर असलेल्या राजेन्द्र उर्फ कुलोत्तुंग चाळुक्यांचा विवाह सुद्धा एका चोळ राजकुमारी बरोबर झाला होता, जी की अधिराजेन्द्र चोळ याची बहीण होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की चाळुक्य आणि चोळ राजवंशातिल सोईरसम्बंध हे पिढीजात असेच होते. त्यांच्यातील अशा या नजीकच्या वैवाहिक सम्बंधामुळे या दोन वंशातील संबंध अधिकच दृढ बनले होते.
खरं तर चोळ वंशात दत्तक गेलेले चाळुक्य राजवटीतील पूर्वज हे खरोखरच हुशार म्हटले पाहिजेत. चोळ वंशात दत्तक जावून आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःच्या चाळुक्य आडनावाचा स्वतःला विसर पडू दिला नाही. पुढे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात चोळ-चाळुक्य राजवट संपुष्टात आल्यानंतर या राजवटीतील चोळ वंशज दक्षिणेकडून महाराष्ट्रात येवून स्थिरावले. महाराष्ट्रात आल्यानंतर चोळ आडनावाचा अपभ्रंश चोर असा झाल्याने हे घराणे पुढील काळात चोर अशा नावाने ओळखले जावू लागले.
इ.सनाच्या सातव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अंतापर्यंत, दक्षिणी भारतात सहाशे वर्षाहून जास्त काळ एक राजवंश म्हणून चोळ-चाळुक्य यांनी सत्ता उपभोगलेली होती. त्यांचे वंशज असलेले चोर उर्फ साळुंखे महाराष्ट्रात येवून तेराव्या शतकानंतर सरदार घराण्यात केव्हा कन्व्हर्ट झाले हे त्यांनाच समजले नाही. तेराव्या शतकानंतर ते देशाला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतच्या कालावधीत देखील चोर उर्फ साळुंखे लोकांची पराक्रमी मनगटे महाराष्ट्राच्या रणभूमीवर चांगलीच तळपली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र असलेले सरदार तुकोजी चोर, भिकाजी चोर आणि भैरव चोर या तिन्ही सरदार चोर बंधूंनी स्वराज्याची पहिली लढाई आपल्या पराक्रमी मनगटांच्या जोरावर गाजवली होती. त्यांनीच काय चोरांतील अनेक पराक्रमी मनगटांनी असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा इतिहास निर्माण केलेला असेल, मात्र त्यातील बहुतांश इतिहास हा इतिहासाच्या डार्क पानांवर लिहिलेला असल्यामुळे दुर्दैवाने तो वाचता न यावा, हेच राजे चोर यांचे दुर्दैव म्हणावे लागेल
वंशावळ
साळुंखे/सोळंके या घराण्यातील पूर्वज राजांनी सहाव्या आणि दहाव्या शतकात अशी एकूण दोन वेळा साळुंखे राजघराण्याची 'राजमुद्रा' बनवली होती. पैकी साळुंखे यांचे चालुक्य आडनाव असताना चालुक्य राजांनी सहाव्या शतकात आपल्या राजघराण्याची राजमुद्रा बनविली होती. तर साळुंखे यांचे सोलंकी (साळुंखे-सोळंके) आडनाव असताना या घराण्यातील महान पराक्रमी राजा सिद्धराज जयसिंह साळुंखे यांनी सुद्धा सोलंकी राजघराण्याची राजमुद्रा (राज्य कार्यकाल इ.स.1094 to 1143) तयार केली होती. - शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज घराण्याची "प्रतिपश्चंद्रलेखे....." ही जी राजमुद्रा बनविली होती. ती बनवताना त्यांनी ज्या काही मोजक्या क्षत्रिय राजवंशाच्या राजमुद्रांचा अभ्यास केला, त्यात साळुंखे/सोळंके राज वंशातील पूर्वज राजांनी बनविलेल्या राजमुद्रेचा क्रमांक वरचा होता. सोलंकी (साळुंखे-सोळंके) घराण्यातील राजा सिद्धराज जयसिंह साळुंखे यांनी तयार केलेली राजमुद्रा ही वेगवेगळ्या सात भागांच्या विभाजनातून बनवली गेली होती. या सात भागांचा वेगवेगळा स्वतंत्र असा अर्थ आहे. आपण तो तपशीलवार पाहुया. .. - 1) राजमुद्रेतील छत्र : - राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सोलंकी (साळुंखे-सोळंके) राज घराण्याचा अंमल होता. हिंदुस्थानात( सोलंकी ) साळुंखे राजांनी धर्मराज्य केल्याचा इतिहास आहे. राज्यातील प्रजेच्या रक्षणासाठी (सोलंकी)साळुंखे राजे सतत दक्ष असायचे. ते प्रजेची विषेश काळजी घेत असत, हे या राजमुद्रेतील छत्र (छत्रीद्वारे) द्वारा दाखवले आहे. (सोलंकी)साळुंखे राजांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रजेच्या शिरावर (डोके) राजांचे कायम छत्र आहे, हे यामधून दाखविण्यात आले आहे. - 2) राजहंस पक्षी : - राजमुद्रेतील दुसरा भाग म्हणजे राजहंस पक्षी.! राजमुद्रेतील सात भागांपैकी हा एक प्रमुख भाग आहे. सोळंकी (साळुंखे-सोळंके) घराण्यातील सिद्धराज जयसिंह सोलंकी यांनी बनविलेल्या स्वतःच्या सोलंकी घराण्याच्या राजमुद्रेतील 'राजहंस पक्षी' हा एक प्रमुख घटक आहे. या राजमुद्रेत दोन राजहंस पक्षी दाखविण्यात आले आहेत. हे दोन्ही राजहंस पक्षी एकमेंकांकडे पहाताना राजमुद्रेत दाखविण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की, राजहंस पक्षी दुधात मिसळलेले पाणी न पिता फक्त दुध पितो, अगदी तसेच सोलंकी राजे हे त्यांच्या राज्यातील न्यायदान वा निवाडा करते वेळी खूप काळजी घेत होते. आणि खऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करीत होते. सोलंकी राजांचे पूर्वज असलेल्या बदामीच्या चालुक्य राजवटीतील राजा, राजा विक्रमादित्या चालुक्य (इस.655 to 680) हा असा राजा होऊन गेला. तो अतिशय न्यायप्रिय राजा होता. त्याच्या न्यायदानाच्या आजही चर्चा ऐकायला मिळतात. तसेच विधीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा राजा विक्रदिमादित्य चालुक्याच्या न्यायदानाविषयी शिकविले जाते. - 3) त्रिशूल : - राजमुद्रेत त्रिशूळ हा एक प्रमुख भाग दाखविण्यात आला आहे. त्रिशूल हे शिवाचे शस्त्र अथवा आयुध समजले जाते.(सोलंकी)साळुंखे घराण्यातील पूर्वज असलेले चालुक्य आणि सोलंकी राजे हे शिवाचे पूजक आणि उपासक असल्याने शिवा वरील नितांत श्रद्धेमुळे त्यांनी स्वतःच्या घराण्याच्या राजमुद्रेत त्रिशूळ ठेवले होते. - 4) ढाल-तलवार : - तलवार हे वीरांचे, क्षत्रियांचे शस्त्र आहे.! (सोलंकी)साळुंखे हा क्षत्रिय वंशातील एक प्रमुख असा राजघराणा आहे. तसेच सोलंकी कुळाचे कूलदेव पुष्करराज (राजस्थान) येथील घोड्यावरील खड्गधारी श्री. ब्रह्मनाथ आणि कुलदेवी खड्गे हाथी असलेली महाकाली देवी आहे. (साळुंखे-सोळंके कुळाचे महाराष्ट्रात आल्यानंतरचे कूलदेव जेजुरी खंडेराय, सोनारी काळ भैरवनाथ तसेच कुलदेवी तुळजा भवानी आहे. साळुंखेतील काही लोक ज्योतिबा कोल्हापूर याला सुद्धा कुलदेव मानतात.) ढाल ही शत्रूच्या होणार्या वाराला, घावाला रोखण्याचे एक प्रमुख साधन आहे. म्हणून (सोलंकी)साळुंखे राजांनी आपल्या राजमुद्रेत ढाल आणि तलवारीला विशेष असे स्थान दिले आहे. - 5) लाकडी फांदी : - (सोलंकी)साळुंखे राजांच्या राजमुद्रेतील लाकडी फांदी हा एक प्रमुख भाग आहे. राजमुद्रेतील लाकडी फांदीवर दोन राजहंस पक्षी बसलेले दाखविण्यात आले असून फांदी खाली राजमुद्रेतील (सोलंकी)साळुंखे राजांचे 'पाटनं रा पातशाही' हे ब्रीद लटकवलेले दाखविण्यात आले आहे. राजमुद्रेतील लाकडी फांदी ही राजमुद्रा, राजहंस पक्षी आणि राजमुद्रेतील ब्रीद या सर्वाना जोडण्याचे काम करत असल्याचे दाखविले आहे. - 6) ब्रीद / वचन : - (सोलंकी)साळुंखे राजांनी स्वतःच्या राजघराण्याची जी राजमुद्रा बनविली होती, त्या राजमुद्रेतील "पाटनं रा पातशाही" हे ब्रीद / वचन दिले गेले आहे. या ब्रीदचा अर्थ असा, की सोलंकी राजांची राजधानी त्या काळातील राजस्थान आणि आत्ताच्या गुजरात राज्यातील पाटन या शहरात होती. या शहरात कशाचीच कमी नसल्याने या शहराला सिद्धपूर पाटन असे सुद्धा म्हटले जायचे. या शहराला भक्कम अशी तटबंदी होती, जी की त्या काळातील जगात तिसर्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत होती. आणि (सोलंकी)साळुंखे राजांची राजधानी असलेल्या या पाटन शहरात त्या काळी सोलंकी राजे धर्मराज्य करीत होते. म्हणून सोलंकी राजांनी जी स्वतःच्या घराण्याची राजमुद्रा बनविली होती, त्या राजमुद्रेतील ब्रीद हे "पाटनं रा पातशाही" असे ठेवले होते. सोलंकी राजांचे पाटन राज्य हे त्या काळी एक पवित्र सरकार म्हणून ओळखले जात होते, हे राजमुद्रेतील या ब्रीद मधून लक्षात येते. - 7) बोध वाक्य : - बोध वाक्य हे राजमुद्रेतील शेवटचा आणि सातवा टप्पा आहे. ''सरणायां साधार चालक राव''.. असे हे राजमुद्रेतील बोधवाक्य आहे. प्रजेच्या नजरेमध्ये राजा कितीही मोठा असला, तरी त्याने आपल्या राज्यातील प्रजेप्रती तसेच देवतांविषयी सदैव लीन, कर्तव्यदक्ष आणि ऋणी असले पाहिजे. हे यातून दाखवले गेले आहे. राजाने प्रजेचे हीत पाहुन राज्य कारभार केला पाहिजे, त्यांचे सेवेसाठी सदैव तत्पर असले पाहिजे. म्हणून (सोलंकी)साळुंखे राजांनी राजमुद्रेतील शेवटच्या टप्प्यातील "सरणायां साधार चालक राव" हे बोधवाक्य त्यात टाकले आहे. (सोलंकी)साळुंखे घराण्यातील येणाऱ्या पिढ्या काळाच्या ओघात स्वतःच्या घराण्याचा इतिहास विसरत चालल्या असल्याचे दिसून येत आहे.! (सोलंकी)साळुंखे हा इतिहासाच्या पटलावरील एक प्रमुख लढाऊ घराणा म्हणून कायम चर्चेत राहिलेला राज घराणा आहे. (सोलंकी)साळुंखे घराण्यातील पूर्वज असलेल्या बदामीच्या चालुक्य राजांच्या राजवटीच्या काळात तर जवळपास निम्मा भारत चालुक्य राजवटीच्या अधिपत्याखाली होता आणि या विशालकाय राजवटीचे राजे होते साळुंखे घराण्यातील पूर्वज असलेले चालुक्य राजे.! - ज्या ज्या राजकुळांनी देशात आणि महाराष्ट्रात धर्मराज्य केली अशा राज कुळामध्ये चालुक्य/सोलंकी म्हणजेच साळुंखे घराण्याचा खूपच वरचा क्रमांक लागतो. साळुंखे कुळातील होऊन गेलेल्या सर्वच राजांनी आपल्या राजकर्तव्याचे माप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतण्याचे काम केले.! साळुंखे(सोळंके) कुळातील पूर्वज राजांनी निर्माण केलेला हा पराक्रमी इतिहासाचा अनमोल ठेवा त्यांच्या वंशजांना भारतीय पाठ्यक्रमातून खूपच त्रोटक प्रमाणात अभ्यासायला मिळत आहे. तसेच पूर्वजांचा पराक्रमी इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता अथवा जिज्ञासू वृत्ती अलीकडच्या काळात लोप पावत चालली असल्याने साळुंखे-सोळंके घराण्यातील पूर्वजांचे पराक्रमी इतिहास त्यांच्या येणार्या पिढ्या विसरत चालल्याचे दिसत आहे.! - साळुंखे घराणा हा इतिहासातील एक राजघराणा आणि नंतरच्या काळातील सरदार घराणा, जहागीरदार, सरंजामदार, ईनामदार आणि देशमुख घराणा म्हणून आपली ओळख निर्माण केलेला घराणा आहे. तसेच या घराण्याकडे रणांगणात लढताना पराक्रमातून मिळविलेल्या जवळपास 62 पदव्या आहेत. शिवाय हा घराणा क्षत्रिय मराठ्यांच्या शहाण्णव कुळी यादीतील एक प्रमुख आणि मोठा घराणा आहे. महाराष्ट्रातील ज्या काही घराण्यातील लोकांनी आपल्या घराण्याची मिळालेली एखादी पदवी आडनावाचे जागी कागदावर लावली आहे, ते लोक आज समाजात अभिमानाने वावरताना दिसत आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे साळुंखे(सोळंके) कुळातील लोक इतक्या सगळ्या भूषणावह पदव्या आपल्या घराण्याकडे असून सुद्धा त्या पदव्या आपल्या आडनावा समोर न लावता फक्त साळुंखे(सोळंके) आडनावाने वावरत आहेत. त्यामुळे साळुंखे-सोळंके कुळातील आजचे वंशज मात्र पूर्वजांचा दैदीप्यमान इतिहास पूर्णपणे विसरून वरील मोठ मोठ्या पदव्या आडनावापुढे लावायच्या सोडून, दुर्दैवाने ते आज फक्त गावपातळीवरील 'पाटील' ही पदवी लावून मिरवताना दिसत आहेत.! चालुक्य- सोलंकी- साळुंखे- सोळंके कुळातील लोकांसाठी काही आवश्यक माहिती :- साळुंखे- सोळंके कुळातील लोकांसाठी मंगल कार्यात उपयुक्त असलेली, काही आवश्यक माहिती.... * कूळ - साळुंखे- सोळंके (चालुक्य) * गोत्र - चुलकी किंवा चालुक्य * देवक - साळुंखी पंख * गुरू - भारद्वाज, मांडव्य, पाराशर * कुलदेवी - भवानी तुळजापूर * जुनी कुलदेवी - काली, पावागड-गुजरात (त्या काळातील राजस्थान) * कुलदेव - 1) खंडेराय - जेजुरी 2) भैरवनाथ - सोनारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद 3) साळुंखेतील काही लोक ज्योतिबा - कोल्हापूर याला सुद्धा आपला कुलदेव आहे. * जुना कुलदेव - ब्रह्मनाथ (पुष्करराज राजस्थान) * वेद - यजुर्वेद * मंत्र - गायत्री * वंश - अग्निवंश (अग्नीतून प्रकट झालेले) * वर्ण - क्षत्रिय मराठा * ध्वज (झेंडा) - पिवळा (ध्वजस्तंभी हनुमान) * सिंहासन - पिवळे * गादी - पिवळी * वस्त्र - पिवळे * वारू (घोडा) - पिवळासरदार रावजी पाटणकर (1600 पाटणमध्ये महादेव मंदिर आहे हे पाटणकर घराण्यातील होते )
/
श्रीमंत सरदार तुकोजी चोर साळुंखे
शिवाजीराजांचे सरनौबत १. तुकोजी चोर (1640-1659 दरम्यान) - ह्यांना सरनौबत केल्याचा उल्लेख फक्त सभासद बखरीत [पृ.९] आणि एका पत्रामध्ये आहे [राजवाडे खंड १७ लेखांक १०]. शिवाजीराजांचे जे मावळातील बालपणीचे मित्र त्यातील हे एक असावे ह्या व्यतिरिक्त ह्याचा उल्लेख सुभानमंगळ च्या लढाई संबंधी शिवभारतात येतो. तुकोजी सोबत एक भैरोजी चोर असेही नाव येते हे दोघे भाऊ होते तुकोजी हे नेमके पायदळाचे सेनापती होते की घोडदळाची सेनापती होते हे मात्र नक्की सांगता येणार नाही श्री शेजवलकर यांच्या मते तुकोजी चोर साळुंखे यांचा मृत्यू 57 वर्ष सन 1659 च्या जुन्नर लुटीत झाला तोपर्यंत ते सरनोबत सरदार तुकोजी चोर साळुंखे म्हणून ओळखले जात होते जुन्नरच्या लुटीमध्ये त्यांना वीरमरण आले.
1640-1659 मराठा स्वराज्या चे पहिले सरसेनापती व पायदळाचे पहिले सरनोबत मृत्यू जुन्नर लूट 1659 यांना शहाजीराजांनी शिवाजी राजेन सोबत पाठवले होते संदर्भ शिव भारत, सभासदाची बकर, शाहू महाराजांची रोजनिशी, शेडगावकर बखर, जेधे शकावली.
/
सरदार भैरव चोर साळुंखे व भिकाजी चोर साळुंखे (1660 सुभान मंगळ गडी शिरवळ येथील शिवाजी राजांच्या पहिल्या युद्धात पराक्रम गाजवला आमीन व मीनाद या आदिलशाही सरदारांचा पराभव केला संदर्भ शिव भारत )
/
सरदार कमळोजी चोर साळुंखे (1660 प्रतापगड युद्धामध्ये पराक्रम संदर्भ शिव भारत)
/
सरदार राणोजी चोर साळुंखे (1690 किल्लेदार अजिंक्यतारा यांची समाधी नागठाणे गावात आहे )
/
पूर्वजाचे नाव माहित नाही 1690 1700)
/
पूर्वजाचे नाव माहित नाही (1700-1730)
/
पूर्वजाचे नाव माहित नाही (1730-1760)
/
सरदार भगवानराव साळुंखे (1760 पानिपत युद्धात कामी आले संदर्भ यादव लिखित पानिपत बखर )
/
सरदार दुर्गुजी साळुंखे पाटील (1760)
/
सरदार गोपाळजी दुगोजी साळुंखे पाटील (गोपाळजी साळुंखे पाटील 1775-1857 इंग्रज सरकारशी विवाद करून बोरगाव गावची पाटीलकी राखली )
/
नाईकजी गोपाळजी साळुंखे पाटील + सिदोजी गोपाळजी साळुंखे पाटील(1820-1850 यापैकी शिदोजी यांच्या नावाने बोरगाव गावच्या वतनदार पाटील भाऊकिस ओळखले जाते)
/
बळवंतराव सिदोजी साळुंखे पाटील नाईकजी( थोरले असल्याने पाटील की चालवलि----------- सिदोजी साळुंखे
/ /
साळुंखे पाटील(1850) कृष्णराव सिदोजी साळुंखे पाटील
⇓ /
माधव कृष्णराव साळुंखे
⇩
शंकरराव माधव साळुंखे पाटील
⇩
यशवंत शंकरराव साळुंखे
⇩
मोहन शंकरराव साळुंखे(मयत)
मारुती कृष्णराव साळुंखे पाटील (1875)
दादासाहेब कृष्णराव साळुंखे पाटील
/ /
(बाळकृष्ण दादासाहेब साळुंखे + दिनकरराव दादासाहेब साळुंखे
(दत्तक=*बाळकृष्ण मारुती साळुंखे पाटील*) +
/
⇓ तुकाराम दादासाहेब साळुंखे पाटील
वसंतराव बाळकृष्ण साळुंखे
विजय बाळकृष्ण साळुंखे
राजेंद्र बाळकृष्ण साळुंखे(मयत) लालासाहेब बाळकृष्ण साळुंखे सतीश बाळकृष्ण साळुंखे